कविता
शासन
राखून मान संविधानाचा ,
चालते तेच खरे शासन .
तालावर स्वतःच्या चालते ,
ते असते मर्कटासन .
जो तो रस्त्यावर येतो ,
हक्कासाठी भांडत बसतो .
शासनाला का माहीत नसते
ज्याचा त्याला हक्क असतो
देश आमचा कृषीप्रधान ,
अन्नदाता आला रस्त्यावर
जगणे मुष्कील केले ,
जगतो ज्याच्या जीवावर.
अंशता अनुदानाची भिक ,
दिली विनाअनुदानीतांना.
जशी दिली जाते ,
लाचार त्या भिक्षुकांना .
थांबायलाच हवे कुठेतरी ,
प्रयत्न करु सारेचजण .
नका मारु नुसत्या बाता ,
सहभागी व्हावेत सर्वजण.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment