वेग
गतीमानता असावी जरी
चुकता कामा नये दिशा
उर्मी मनात सदैव असावी
जागृत चेतना असावी आशा
वेगावर नियंत्रण,सुखाला आमंत्रण
ध्यानी ठेवावे वचन भारी
नियम असतात पाळण्यासाठी
विसरून जाते जनता सारी
अपघात आहे ठरलेलाच
अतिवेगामुळे जातो जीव
रस्त्यावरच्या पाहता कसरती
वाटते तरुणाईची मनात कीव
जीवन आहे अनमोल गड्या
यशासाठी वेग हवा खरा
देतो संदेश काळ जनाला
अनियंत्रित वेग नाही बरा
रचना
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे
कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर
No comments:
Post a Comment