*ओटीटी आणि इंटरनेटच्या जमान्यामध्ये संस्कारमय समाज निर्मितीसाठी शिक्षकाची भूमिका महत्वपूर्ण आहे का?*
समाजामध्ये कितीही आधुनिक तंत्रज्ञान आले असले व त्यांनी शिक्षकांची भूमिका घेतली तरी सुद्धा शिक्षकाचे महत्व हे कधीही कमी होत नाही व होणारही नाही. इंटरनेटच्या जमान्यामध्ये शैक्षणिक, बौद्धिक व संस्कार देणारे अनेक कार्यक्रम सचित्र पाहायला मिळतात पण त्यामध्ये भावना अजिबात नसतात. संस्कारासाठी, जिवंत समाज निर्मितीसाठी शिक्षकाची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. कारण विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याकरिता एक निर्जीव वस्तू नाही तर सजीव व्यक्तीची गरज असते. भले इंटरनेटच्या द्वारे अनेक माहितीचा महासागर त्यांच्यासमोर ओसंडून वाहत असला तरी सुद्धा प्रत्यक्ष शिक्षकांनी शिकवलेले ज्ञान हेच लक्षात राहते.
श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे कुरुंदवाड
No comments:
Post a Comment