शब्दगंध साहित्य मंडळ आयोजित काव्य लेखन उपक्रम
उपक्रम क्रमांक २०
दिनांक ५/५/२०२६
विषय - आला उन्हाळा
जीवाची काहीली करत
आला आला उन्हाळा आला
धारा घामाच्या लागल्या
कासविस जीव झाला
भास्कर हा तापला तापला
आला उन्हाळा सांगू लागला
झाले मलूल चराचर सारे
लागे वृक्ष छाया शोधायला
रणरणत्या उन्हातून जाती
कारागीर स्वत:च्या पोटासाठी
पाय पोळते अनवाणी आता
भांडती लेकरे ताटासाठी
घर्मबिंदू पुसायाचे किती
पदर ओला चिंब झाला
लेकराच्या जीवापुढे मायेने
सूर्य सारा डोक्यावर घेतला
काय करावे काय सूचना झाले
वृक्षराईची महती पटू लागली
सज्ज होऊ सारे पेरु बीजाला
वृक्षवल्लीची महती पटली
कवयित्री
श्रीमती माणिक कल्लाप्पा
नागावे कुरुंदवाड
जिल्हा, कोल्हापूर
९८८१८६२५३०
No comments:
Post a Comment