मन
आज माझं मन खूप आनंदी आहे. आज माझं मन खूप दु:खी आहे, ऊदास आहे.असे ऊद्गगार आपणास सगळीकडे ऐकायला मिळतात.मनाला लगलं माझ्या, मनाला लागेल असं बोलू नये.मन मारायला शिक असा सल्लाही मुलींना दिला जातो. पण नेमकं मन म्हणजे काय ? याचे उत्तर कुणाला देता येणार नाही. आजपर्यंत मनाची परिपूर्णपणे व्याख्या कुणीच करु शकले नाही.
मन म्हणजे आपल्या भावना असं म्हणू शकतो.कारण आपण आनंदी, दु:खी होतो तेव्हाच आपल्याला मनाल लागले,कींवा मनाला आनंद झाला असे म्हणतो.बहिणाबाईंनी देखील मनासंबधी आपले विचार प्रकट केले आहेत.त्यांच्या मताप्रमाणे मनावर आपला ताबा राहू शकत नाही. जैन तत्वज्ञानात ,धर्मात जैन मुनींना दिगंबर दिक्षा प्राप्त करायची असेल तर त्यांना आपल्या षडरिपूंवर ताबा होतो तेंव्हाच दिक्षा दिली जाते , याचाच अर्थ असा होतो की ते आपल्या मनावर पूर्णपणे ताबा ठेऊ शकतात. आपल्या मनात अनेक चांगले व वाईट विचार नेहमी येत असतात. त्यावेळी सारासार विचार करून आपण ठरवत असतो की काय करावे.हा सारासार विचार म्हणजे मनाचाच भाग म्हणता येईल. जो सुशिक्षित आहे , रोजगार करतो त्याच्या मनात वाईट विचार यायची शक्यता कमी असते.पण ज्याला स्वतःचे एकवेळचे पोट भरायची भ्रांत असते तो अविचार करु शकतो.त्यामुळे असे म्हटले आहे की," मन चंगा तो कठौती में गंगा " आपला विकास, प्रगती, अधोगती आपल्या मनावर अवलंबून आहे. तेव्हा शरीर निरोगी असावे. कारण " निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असते." हे बरोबर आहे. कारण मनाची एकाग्रता ही शारीरिक व्याधींवर केंद्रित झाली तर स्वविकासाला वेळ देता येत नाही. त्यामुळे नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम, योगासने, प्राणायाम केले पाहिजेत. मन हे चंचल आहे. क्षणात ईथे तर क्षणात तिथे ते सहजपणे विहरु शकते.आपल्या मनातील विचार कधीही दाबून ठेवायचे नाहीत, तर ते दिलखुलासपणे व्यक्त होऊ द्यावे. तरच आपण तणावरहित जीवन जगू शकतो.मनातील विचार प्रकट झाले तरच आपण सुखी होऊ शकतो..चला तर मग व्यक्त होऊ या.मन मोकळे करु या व जीवन आनंदी बणवू या.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment