शब्दरुपी बाण तुझे
भिडले काळजांतरी
लाज आली गाली
धुंद मी हृदयांतरी
Thursday, 19 October 2017
Tuesday, 17 October 2017
प्रदुषण मुक्त दिवाळी
स्पर्धेसाठी
चारोळी
प्रदुषण मुक्त दिवाळी
नका फोडू फटाके हवेत
करा प्रदुषण मुक्त दिवाळी
पर्यावरणरक्षण हाती घ्या
करु श्वासाला जागा मोकळी
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
Sunday, 15 October 2017
वाचनाचे महत्व
लेखस्पर्धेसाठी
विष -- वाचनाचे महत्व
" वाचाल तर वाचाल " असे म्हटले जाते ते अगदी खरं आहे .वाचनाने आपल्याला खूप उपयुक्त अशी माहीती मिळते.वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते .जीवनात वावरताना काय चांगले काय वाईट हे समजते म्हणजेच मन विचारी बनते.आपण मोठ्या संकटाना सामोरे जातो , थोडक्यात सांगायचे तर आपण वाचतो , सुरक्षित राहतो.
विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकाबरोबरच संदर्भ पुस्तकेही वाचली पाहीजेत जेणेकरुन त्या घटकाबद्दल पूर्ण माहीती मिळते. तो घटक व्यवस्थित समजतो. पेपर सोडवताना याचा फायदा होतो.
भारताचे माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना वाचनाची आवड होती . त्यांचे वाचनही खुप झाल्यामुळे त्यांची वैचारिक प्रगल्भता प्रचंड होती .विचारात साधेपणा होता .त्यांनी लिखाणही भरपूर केले आहे.आपले विचार ईतरांपर्यत पोहचवले आहे.यामुळे शासनाने त्यांचा जन्मदिवस " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करायचे ठरविले आहे , त्यानुसार विविध ठिकाणी हा दिन मोठ्या ऊत्साहात साजरा केला गेला.वाचनाचे , पुस्तकाचे महत्व सांगीतले गेले.वाचनाचे तास घेऊन वाचनप्रेरणा देण्यात आली.
वाचनाने मनातील मळभ दुर होते .मन प्रसन्न बनते. जेवढे वाचन करु तेवढं मन आनंदित होते . वाचनाने आपल्याला देशविदेशातील माहीती मिळते .
म्हणून वाचतच राहीले पाहीजे व ज्ञानाचा प्रकाश घरोघरी पोहचवला पाहिजे .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता शिरोळ ,
जि.कोल्हापूर .
काव्यरुपी सुविचारांचे सुगंधी साबण
स्पर्धेसाठी
विषय -- काव्यरुपी सुविचारांचे सुगंधी साबण
आनंदवन
आनंदवनी पोहचलो जेव्हा ,
अनुभूती वेगळी आली तेव्हा
सर्वधर्मसमभाव मानवताच दिसली,
आपुलकीची भावना मनात दाटली.
स्वावलंबन शिस्त ती भारी ,
स्वच्छता नांदतसे दारी .
हस्तकलेत निपुण सगळे ,
प्रत्येकाचे रुप आगळे .
कुणी कुणाचा मालक ना दास,
प्रत्येकाला कामाचाच ध्यास
झाडाफुलांचा निसर्ग खेळतो
श्रमसाफल्याचा हार माळतो
भूमी आगळी लोक वेगळे,
बिनहत्यारी सर्व मावळे .
कुणी न नेता ना सेनापती ,
आम्हीच हो ईथले नृपती .
प्रणाम करुनी मी नतमस्तक
आत्मभान देतसे दस्तक .
कोण आपण कुठली जनता
जपली जाते फक्त मानवता.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
9881862530 .
दिवाळीचा फराळ
स्पर्धेसाठी
विषय - दिवाळीचा फराळ
आली दिवाळी आनंदाची ,
सर्व सणांतील महत्वाची .
फराळांची येथे लयलूट ,
नाही गणती करायची .
फराळाला ना तोटा येथे ,
लाडू चकली चिवडा बुंदी .
करंजी शंकरपाळे अनारसे ,
खाऊन येईल खास धुंदी .
सगेसोयरे मित्रमंडळी ,
जमले सारे झाली गोळा .
फराळाचा पाडण्या फडाशा,
बालगोपालांचा जमला मेळा
आकाशकंदिलाची झगमग ,
अन् पणतीचा मंद प्रकाश .
दारात शोभे रांगोळी सुंदर ,
रोषनाईने प्रकाशले आकाश
अशीच रोषनाई फुलवा ,
अनाथांच्या अंधारजीवनी.
फुलवा हास्यज्योती मधुर,
चेहऱ्यावर त्यांच्या दानानी.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
Saturday, 14 October 2017
संसार
स्पर्धेसाठी
झटपट चारोळी स्पर्धा
विषय-- संसार
असा करावा संसार नेटका
मन , बुद्धी ठेऊन ताब्यात
वेळ नाही लागत मोडायला
सहज जातो तो धोक्यात.
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर.
मानवा जागा हो
काव्यस्पर्धेसाठी
फेरी क्रं. 11
कोड क्रं. -- 1028
विषय -- विररस
मानवा जागा हो
जाग मानवा जागा हो ,
परीवर्तनाचा धागा हो .
पेटुन उठू देत बाहू तुझे ,
भ्रष्ट या लाचार दुनियेत ,
अविवेकाचा आलाय पूर .
विवेकबुद्धी वापरून तुझी ,
खरच ,कर तू यांना दूर .
स्फुलींग पेटवून हृदयात ,
अन्यायाचा पाडाव कर .
लाख आशा तुझ्यावरच ,
न्यायाची तू कास धर .
चल ऊठ , जागा हो ,
ऊठवणार नाही कोण तुला .
जागृत कर मनीच्या आशा ,
मानवतेची आन तुला .
भारतमाता वाट पाहते ,
सुंदर , रम्य सकाळची .
तूच आहेस तिचा त्राता ,
कर पूर्तता तिच्या स्वप्नांची .
कोड क्रं. -- 1028