Thursday, 12 October 2017

भेट प्रेमाची

स्पर्धेसाठी

        शब्दचारोळी

विषय - भेट प्रेमाची

तुझी नी माझी भेट प्रेमाची
अशीच फुलत राहो सदा
मानवतेच्या स्पर्शाने खुलो
प्रेम आपुले असेच सदा.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Wednesday, 11 October 2017

दागदागिने

स्पर्धेसाठी

विषय -- दागदागिने

सजून वधू ऊभी मंडपी
शोभे दागदागिने सुंदर
खरे दागिने शील नम्रता
तेच बनवी घर मंदिर.

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Monday, 9 October 2017

स्पर्धेसाठी

      चित्रचारोळी

पाहता तुला कवेत त्याच्या
सखे निशब्द दुःखी झालो ग
एकांती चंद्रासम निस्तब्ध
काठी जलाशयाच्या आलो ग.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर.
9881862530 .

पुनम का चाँद

प्रतियोगिता के लिए

   पुनम का चाँद

जमीन से लेके फलक तक
बस तेरा ही दिदार है |
झलक पाने की तेरी ,
हर एक का इंतजार है |

अमावस के बाद पुनम
अंधेरे के बाद उजाला |
दुःख के बाद सुख ,
करो न कभी मन मैला |

प्रेमीयोंके आखोंका तारा
सुहागणोंका रखवाला |
कवियोंकी कल्पना का बिंदू
है सदा आजीवन मतवाला |

चाँद की तुम चाँदणी ,
फैली रोशणी जगमग नभमें
पावन तू मनभावन तू
प्यार सदा तेरे ऊर में |

पूर्णत्व का एहसास तू
आनंद की भरमार तू
आकाश का दिया तू
बच्चोंका चंदामामा भी तू |

कवयित्री

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

परतीचा पाऊस

स्पर्धेसाठी

       चारोळी स्पर्धा

     परतीचा पाऊस

कोसळला अंदाधुंद काल
परतीचा पाऊस जोराने
अवकाळी का हस्तनक्षत्र ?
काय करावे बळीराजाने ?

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

Sunday, 8 October 2017

खरे बोला

स्पर्धेसाठी

लेखस्पर्धा  -- खरे बोला

" सत्य मेव जयते " अर्थात सत्याचाच नेहमी विजय होतो , हे वचन फक्त वचनच नाही तर ती वस्तुस्थिती आहे.
        जीवनात , आयुष्याच्या चढऊतारातून मार्गक्रमन करताना अनेकवेळा खोटेपणाचा अनुभव आलेला असतो. दररोज आपल्या अवतीभोवती अनेकजण सतत खोटे बोलताना दिसतात.विशेष म्हणजे त्याचे त्यांना काहीही वाटत नाही.असं काहीजण म्हणतात की " खोटं बोला खर नेटानं बोला " हे अशा लोकांना तंतोतंत लागू पडते.पण एकवेळ अशी येते की हे लोक चारचौघात तोंडघशी पडतात.पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

    सुटलेला बाण व बोललेला शब्द कधीही मागे घेता येत नाही.तसेच बाणाने घेतलेला वेध ,व शब्दाने झालेली जखम कधीही भरुन न येणारी असते. म्हणून नेहमी खरे बोलावे

खरे बोलल्याने काही वेळेला आपणच अडचणीत येतो पण पश्चातापाची वेळ कधी येत नाही व कुणाच्या आधिनही राहण्याची गरज नसते.परमेश्वराला जरी कुणी पाहीलं नसलं तरी ,     "सत्य हाच परमेश्वर " असं म्हटलं जातं. म्हणजे परमेश्वरावर जेवढी श्रद्धा असते तेवढीच श्रद्धा सत्यावर असते.

खरे बोलावे असे फक्त म्हणून चालत नाही ,तर शब्दाला कृतीची जोड देणे महत्त्वाचे असते.आपण जर खरेपणाने वागलो तर बाकीचे आपल्यावर अवलंबून असणारेही खरेच वागतात .सत्याची शिकवण ही शिकवून होत नसते तर ती रक्तातच म्हणजेच ऊपजतच असावी लागते.

   महत्वाचे म्हणजे खरे बोलणा-या व्यक्तीला कधीही कुठलाही तणाव येत नाही .कारण एक खोटे बोलले की ते झाकण्यासाठी पुन्हापुन्हा खोटे बोलावे लागते व ते सिद्ध करण्यासाठी आटापीटा करावा लागतो व मग मानसिकता बिघडते .

" सत्याला " मरण नाही .शेवटी सत्याचाच विजय ठरलेला असतो.ज्याप्रमाणे     " टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही " तसेच खरे बोलून निश्चींत रहाणे केंव्हाही चांगले.तर मग , नेहमी खरे बोला ,आनंदी रहा.

   श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर.416106

सुहागन

प्रतियोगिता के लिए

      सुहागन

सुहाग को अपने दिलसे
चाहती है हर सुहागन
उसीके एहसास से जागा
वो नशीबवाली का आँगन

    रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .