अ.भा.शि.साहित्य-कला-मंच
मासिक काव्यलेखन स्पर्धेसाठी कविता
विषय- अशा सांजवेळी
शिर्षक- सूर्यास्त
विचार आले अशा सांजवेळी
आवर्तने घेत मनामनातून
पाहून सुर्यास्त आकाशात
सौंदर्य भरले कणाकणातून
फिरती माघारी घरट्याकडे
खग फडफडवती पंख ओढीने
आस मनाला सान पिलांची
राहती सहकार्य अन् गोडीने
ओढ आईची लेकराला
माता आगतिक संसारासाठी
दिवस बुडण्याची भिती मनात
धडपड करी पोहचण्यासाठी
छटा सोनेरी तरुवरी फुलल्या
आसमंती लालीमा पसरली
दृश्य मनोहर पाहून हसली
धरा रोमहर्षित पहा झाली
शिणलेल्या मनाला हवा विसावा
पारावर गोतावळा जमला
जाणून घेतले सुखदुःख सारे
मनोभावनांचा निचरा झाला
आयुष्याच्या सांजवेळी
हिशोब जीवनाचा केला
आपलेच संचित आपल्या हाती
सारा कर्तृत्व कर्माचा बोलबाला
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment