Sunday, 26 March 2017

आजीआजोबा

मलाही हवेत आजी आजोबा


आजी आजोबा हे सगळ्यांच्या घरी आसलेच पाहीजेत अस माझ मत आहे .कारण आजी आजोबा ज्या घरात असतात ते घर कुलुप न लावता सुरक्षित असत.घराला घरपण येत .घरामध्ये सर्वांना जोडणारा ते एक दुवा असतात .मला आजोबांच सुख मिळाल नसल तरी आजी माझ्याबरोबर खुप वर्षे होती .

सर्वात महत्वाचे म्हणजे आजी आजोबा ही दोघे संस्कारमोती देणारी मंदिरे असतात. आजच्या धावपळीच्या युगात आईबाबांना मुलांकडे द्यायला वेळ नाही .अशावेळी घरी आजीआजोबा असतील तर आपण आपल्या मुलांबद्दल ,त्यांच्या संस्काराबद्दल ,घराबद्दल,घराच्या सुरक्षिततेबद्दल अगदी निर्धास्त राहू शकतो.

आजीआजोबा घरी असलेच पाहीजेत.त्या दोघांना मुले वाटुन घेतात.हेही चुकीचे आहे.त्यांना एकत्रच राहुद्या .आपला भविष्यकाळ सुखाचा जायचा असेल या दोन संस्कारदेवतांना जवळ ठेवा .


श्रीमती माणिक क.नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.- कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment