श्रीमती माणिक नागावे यांचा मराठी कवितासंग्रह 'भावतरंग' आता फ्लिप बुक स्वरुपात इंटरनेटवर उपलब्ध झाला आहे.... सदर पुस्तक इंटरनेटवर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे... http://fliphtml5.com/fkws/jiwr
Tuesday, 13 September 2016
Monday, 8 August 2016
थोड दमानं घे
वाट चातकासारखी पाहीली ,
सा-या अंगाची काहीली झाली.
आलास तू बरसतच असा ,
पळता भुई थोडी व्हावी जसा
पावसा तू असा रे कसा ?
कसा ठेवायचा तुझ्यावर भरवसा ?
नव्हतास तर लागली होती आस,
पाण्यात बुडाल्याचा होतोय आता भास .
बरसलास तू मुसळधार,
थांबेना ती संततधार.
कोरडी नदी पाण्याने भरली
दुथडी भरून वाहू लागली.
शिवाजी पुलाची मच्छिंद्री झाली ,
धोक्याची पातळी ती ओलांडली .
बंद रस्ते, झाली कोंडी वाहतुकीची ,
लगबग झाली मग स्थलांतराची.
थोड तू आता दमानं घे ,
आहेस हवा पण जरा ऊसंत घे.
वागू नको असा वेड्यासारखा
लाऊ नको मोजायला दिवसा तारका.
सा-या अंगाची काहीली झाली.
आलास तू बरसतच असा ,
पळता भुई थोडी व्हावी जसा
पावसा तू असा रे कसा ?
कसा ठेवायचा तुझ्यावर भरवसा ?
नव्हतास तर लागली होती आस,
पाण्यात बुडाल्याचा होतोय आता भास .
बरसलास तू मुसळधार,
थांबेना ती संततधार.
कोरडी नदी पाण्याने भरली
दुथडी भरून वाहू लागली.
शिवाजी पुलाची मच्छिंद्री झाली ,
धोक्याची पातळी ती ओलांडली .
बंद रस्ते, झाली कोंडी वाहतुकीची ,
लगबग झाली मग स्थलांतराची.
थोड तू आता दमानं घे ,
आहेस हवा पण जरा ऊसंत घे.
वागू नको असा वेड्यासारखा
लाऊ नको मोजायला दिवसा तारका.
वृक्ष माझा सखा
झाडे लावा , झाडे जगवा,
घोष हा न्यारा.
वृक्षसंवर्धनाचा घेतला वसा,
तडीस नेईल तोच खरा.
घोषणा सरकारी दरबारची ,
2 कोटी वृक्षलागवडीची.
जनजागृती खूपच झाली ,
रोपे जोमात डुलू लागली.
लावली रोपे आता प्रतिक्षा पावसाची ,
गरज आता पाणी आणि मातीची.
जपणूक करूया वृक्षांची ,
चिंता हरेल भविष्याची.
आभाळ बोलले धरतीला ,
वृक्ष माझा सखा.
बोलून गेला आधी ,
हेच आमचा तुका.
भविष्यातील सुखमय जगणे
मानवा तुझ्याच रे हाती.
वृक्षारोपण, संवर्धनाने ,
वाचव तू आता धरती.
---------------------
घोष हा न्यारा.
वृक्षसंवर्धनाचा घेतला वसा,
तडीस नेईल तोच खरा.
घोषणा सरकारी दरबारची ,
2 कोटी वृक्षलागवडीची.
जनजागृती खूपच झाली ,
रोपे जोमात डुलू लागली.
लावली रोपे आता प्रतिक्षा पावसाची ,
गरज आता पाणी आणि मातीची.
जपणूक करूया वृक्षांची ,
चिंता हरेल भविष्याची.
आभाळ बोलले धरतीला ,
वृक्ष माझा सखा.
बोलून गेला आधी ,
हेच आमचा तुका.
भविष्यातील सुखमय जगणे
मानवा तुझ्याच रे हाती.
वृक्षारोपण, संवर्धनाने ,
वाचव तू आता धरती.
---------------------
Sunday, 24 July 2016
सुखी जगण्याचा मंत्र
जीवनात सुखाचे व दुःखाचे असे अनेक प्रसंग येत असतात. आपण सुख आले कि हुरळून जातो व दुःखात निराश होऊन. हे होतच राहत सुख व दुःख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण असे रात्री मागून दिवस व दिवसामागून रात्र येतच असते. हे आपण थांबवू शकत नाही किंवा टाळू शकत नाही यावर एकच उपाय राहतो तो म्हणजे आपणाला हि पृथ्वी सोडायला लागेल ते आपल्याला शक्य नाही जे आहे ते आपणाला स्वीकारायला पाहिजे. तुम्ही जीवनातील सुखाच्या क्षणी सर्व चिंता, काळजी विसरली जाते तेंव्हा तुम्ही सुखाचा खऱ्या अर्थाने उपभोग घेत असता. त्यावेळी दुःख एकएक करून तुमच्या पासून दूर होऊ लागते. कोणत्याही व्यक्तीला दुःख नको असते हे जरी खरे असले तरी त्याची कारणे कोठे ना कोठे आपल्या हातून नकळत झालेल्या चुकांमुळे अशी दुःख आपल्यावर ओढवली जात असतात. अशा दुःख पासून वेळीच सावध होणे गरजेचे असते नाहीतर नैराश्य येऊन तुमची सद्सदविवेक बुद्धी काम कारेनाशी होते त्यापासून स्वतः च्या मनामध्ये नकारात्मकता वाढीस चालना मिळते हे लक्षात ठेवा.
नकारात्मक विचारांचे प्राबल्य वाढले की मनुष्य दिशाहीन होतो. यावर एकमेव उपाय म्हणजे स्वतः विचारसरणी सकारात्मक ठेवणे होय. सकारात्मकता म्हणजे नेमके काय? सकारात्मक विचार म्हणजे आपण स्वतः ची बुद्धी, मन जागृत ठेऊन चांगला विचार करून दूरदृष्टीने यशासाठी सतत प्रयत्न करणे, यश मला मिळणारच हि मानसिकता तयार करणे होय.
कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना त्याविषयी सर्व माहिती करून घेतली पाहिजे. त्याच बरोबर तशी मानसिकता बनत असते मग काम करताना त्यातील यश अपयश याची जाणीव तुम्हाला येते आणि अडथळा बनणाऱ्या गोष्टी तुम्ही वेळीच सावरून यशस्वी होऊ शकता. जरी त्यातून हि अपयश आले तर स्वतःचे मन खचत नाही, दुःखी होत नाही
नकारात्मक विचारांचे प्राबल्य वाढले की मनुष्य दिशाहीन होतो. यावर एकमेव उपाय म्हणजे स्वतः विचारसरणी सकारात्मक ठेवणे होय. सकारात्मकता म्हणजे नेमके काय? सकारात्मक विचार म्हणजे आपण स्वतः ची बुद्धी, मन जागृत ठेऊन चांगला विचार करून दूरदृष्टीने यशासाठी सतत प्रयत्न करणे, यश मला मिळणारच हि मानसिकता तयार करणे होय.
कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना त्याविषयी सर्व माहिती करून घेतली पाहिजे. त्याच बरोबर तशी मानसिकता बनत असते मग काम करताना त्यातील यश अपयश याची जाणीव तुम्हाला येते आणि अडथळा बनणाऱ्या गोष्टी तुम्ही वेळीच सावरून यशस्वी होऊ शकता. जरी त्यातून हि अपयश आले तर स्वतःचे मन खचत नाही, दुःखी होत नाही
Subscribe to:
Posts (Atom)