भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम -७५०
दिनांक: २९/१२/२०२५
अष्टाक्षरी कार्यशाळा
विषय- मन चंचल पाखरु
शिर्षक -चंचल मन
मन चंचल पाखरु
आले फिरुन फिरुन
कीती पाहता पाहता
वाटे दिसे ते दूरन
वेग वाऱ्याचा सदैव
नाही स्थिरता जिवाला
कीती पाहते बांधाया
पुढे न लागे हाताला
शोध मनाचा घेतसे
काय म्हणावे तयाला
सापडेना अजूनही
म्हणू कळेना कशाला
रंग कोणता असेल
धुंदी चढते यशाची
विसावते कधी कुठे?
भ्रांत नसते कशाची
तरी चंचल मनाची
सारी आहारी गेलेली
विण न सुटे कधीच
सदोदित सांडलेली
बंध मनाचे मनाशी
नाही तुटता तुटतं
नाते माय लेकराचे
कधी नाहीच आटतं
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड जिल्हा.कोल्हापूर